वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे
Vrikshvalli Aamha Soyari Vanchre

                वृक्ष, झाडे आपणास ऑक्सिजन देतात, ऑक्सीजन ज्याच्याशिवाय आपण काही मिनिटांपेक्षा जास्त जगू शकत नाही. वृक्ष आपल्याला सावली देतात, पशू पक्षी या सावलीत रखरखत्या सूर्यापासून आसरा घेतात. वृक्षांची मुळे जमिनीची धूप रोखतात ज्याने चांगली पिके येण्यास मदत होते. विविध प्रकारचे वृक्ष, झाडे, झुडपे, वनस्पती, पिके आपल्याला अन्नधान्य, फळे, भाज्या देतात. औषधी वनस्पती, कंदमुळे यामुळे बऱ्याच रोगांवर उपाय होतो. घरासाठी लागणारे लाकूड सुद्धा याच वृक्षांपासून आपणास मिळते. ही झाडे आपल्याला रबर सुद्धा देतात ज्याने टायर बनवले जातात, दळणवळण होते, व्यवहार वाढतो, हीच झाडे आपणास घर, दुकाने बांधायला लाकूड देतात. वृक्ष मानवी जीवन चक्राचा एक अविभाज्य घटक आहे.

                हे सर्वकाही आणि अश्या बऱ्याच गोष्टी ही वृक्ष आपल्याला देतात, अगदी निस्वार्थपणे. आपण मात्र या उपकारांची परतफेड कशी करतो? वृक्षतोड करून, प्रदूषण करून, पिकांवर विषारी फवारे मारून, रानामध्ये वनवे लावून, आपल्या पालनकर्त्या निसर्गाचाच संहार करून. किती क्रूर आणि बद्ध झालाय माणूस, आपण आपल्या हातानेच आपल्या भावी अस्तित्वाचा विनाश लिहत आहोत.

                आता ही वृक्षतोड एवढी सामान्य सामान्य झाली आहे कि आपणास याबद्दल काहीच वाटत नाही. आपण असे वागत आहोत की काही घडतच नाहीये. आपली ही वागणूक एके दिवशी आपल्याला खूप मोठ्या संकटात पाडणार आहे आणि त्याची सुरुवातही झालेली आहे. आपण पाहतो आजकाल दुष्काळ खूप पडतो, पाण्याची टंचाई जाणवते, पृथ्वीचे तापमान वाढत आहे, समुद्राची पातळी वाढत आहे. निसर्ग देत असलेल्या या सर्व चेतांवण्याकडे आपण आपण दुर्लक्ष करत आहोत. जर निसर्गाचा, जंगलांचा असाच ऱ्हास होत राहिला तर तो दिवस दूर नाही जिथे मानवाचे, पशुपक्ष्यांची जगणे अशक्य होईल.

                पशु, पक्षी, वृक्ष, जंगले आणि अगदी कीटकसुद्धा मानवी जीवन चक्राचा भाग आहेत, आपण हे अगदी सहावी, सातवीच्या पुस्तकात शिकलो आहोत. हे सत्य समजून घेणे अवकाश विज्ञानासारखे कठीण ही नाही. वृक्षतोड केली, जंगले जाळली हे तर हे जीवन चक्र तुटू शकते आणि याचा परिणाम सर्व सजीवांना आणि मानवालाही भोगावा लागेल. जर आपण असाच निसर्गाचाच विनाश केला तर आपल्याला अन्नधान्य कुठून मिळेल. मनुष्य प्लास्टिक आणि काँक्रीट खाऊन तर जगू शकत नाही. हे सगळे समजायला तसे सोपं आहे, आणि आपणास ते कळते सुद्धा, तरीही आपण वृक्षतोड, वणवे थांबवत नाही.

                  यावरती उपाय म्हणून सरकार, विविध सामाजिक संघटना अनेक प्रकारच्या योजना, परियोजना आमलात आणतात. पण त्या फक्त घोषणा आणि निधीच्या चक्रातच अडकून राहतात. विविध नियम, कायदे मानवाला अवैध वृक्षतोडी पासुन परावृत्त करण्यात सफल होऊ शकले नाहीत.

                     नवीन बनलेल्या तेलंगणा राज्यात काही वर्षांपासूनहरित हरमनावाचा वृक्षारोपण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या वृक्षारोपण मोहिमे अंतर्गत दर वर्षी लाखो झाडे लावली जातात, हि मोहीम तेलंगणाचे मुख्यमंत्री श्री के.चंद्रशेखर राव यांच्या मनाजवळची आहे. या मोहिमेत सिनेमा आणि व्यापार जगातील प्रसिद्ध व्यक्तींनीही भाग घेतला. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या मोहिमेत सर्व सामान्य लोकांनी मनापासून भाग घेतला. देशात नाही तर जगभरात अश्या वृक्षारोपण मोहिमांची गरज आहे.

                   एक झाड पूर्ण वाढायला वर्षे जातात आणि आज काळाच्या प्रगत हत्यारांनी ते काही मिनिटात तोडता येते. आपण अगोदरच निर्सगाचा खूप दुरुपयोग केला आहे, अजूनही वेळ गेलेली नाही, आज ही आपण आपल्या निसर्गाचे सौदर्य परत आणू शकतो.