इंटरनेट 
Internet

सकाळची वेळ १०.३० ची अमेरिकेतल्या एका उत्तुंग इमारतीत महत्त्वाची मिटींग बोलावली होती. विषय खूप गंभीर होता. या मिटींगसाठी त्याविषयातील जाणकार तज्ञ आली होती. एक गंभीर परिस्थिती उद्भवली होती. त्या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी ही मिटींग बोलावली होती. नुकतेच एका हॅकरनी इंटरनेटवरील एका प्रोग्रामद्वारे 'आय लव्ह यु' नावाचा व्हायरस सोडला होता. या व्हायरसद्वारे इंटरनेटवरील अतिमहत्त्वाची माहिती पुसली जाणार होती किंवा त्या माहितीत बदल होण्याचा संभव होता. यावर उपाय योजण्यासाठी ही बैठक बोलावली होती.

या बैठकीत तज्ज्ञांनी विचार मांडून त्यावर तोडगा शोधला. एका अँटीव्हायरस विकसित केला. या अँटीव्हायरस प्रोग्रामद्वारे तात्पुरता या परिस्थितीवर उपाय योजला गेला. जोपर्यंत पुढे गंभीर परिस्थिती उद्भवत नाही तोपर्यंत हे शास्त्रज्ञ निर्धास्त झाले.

 तर या इंटरनेटची सुरुवात ७० व्या दशकात झाली. इंटरनेट असे जे जाळे जे एकमेकांना जोडले आहे. अमेरिकेमध्ये सुरुवातीला संरक्षण दलातील माहिती आदान-प्रदान करण्याकरिता हे तंत्रज्ञान विकसित केले गेले. त्यालाच व्यापक असे जागतिक रूप देऊन इंटरनेटची सुरुवात केली गेली या इंटरनेट 'वर्ल्ड वाईड बेब' असेही म्हणाले जाते. असे जे जाळे जे जागतिक पातळीवर पसरले आहे.


 इंटरनेट असण्यासाठी पहिली गरज संगणक असावे लागते नंतर दुसरे महत्त्वाचे उपकरण मोडेम लागते. भारतात या इंटरनेटची सुरुवात १९९४ साली पासून सुरू झाली. आज आपण मोबाईलवर सहजरीत्याे इंटरनेट वापरू शकतो.

वर उल्लेख केल्यामुळे या इंटरनेटचे काही धोकेही आहेत. सध्या 'आय लव्ह यू', 'बग' या नावाने अनेक व्हायरस सध्या धुमाकूळ घालत आहेत. हे एका प्रकारच्या प्रणाली (प्रोग्राम)मध्ये बनविलेले असतात, जे चुकून इंटरनेटवरती काम करतेवेळी आपल्या हातून उघडले गेले तर आपल्या संगणकातील नव्हेच तर आपल्या संगणकाला 'लॅन'मार्फत (लोकल एरिया नेटवर्क) जोडल्या गेलेल्या सर्व संगणकातील महत्त्वाची नोंद यामुळे पुसली जाते. किंवा त्यामध्ये फेरफार होतात तर हे इंटरनेट हॅकर हे खरेतर याबाबतीत तज्ज्ञ असतात ते इंटरनेटमार्फत देशाची जी गुप्त माहिती आहे, ती पळवून इतर देशांना विकतात.

इंटरनेटच्या आहारी गेलेली इतकी माणसे आहेत की दिवस-दिवस ते इंटरनेट पुढे बसून असतात. त्यामुळे त्यांना भूक लागत नाही पण खूप वेळ बसल्याने त्यांना पाठीचा त्रास होत राहतो. हा खरंच खूप गंभीर प्रश्न आहे.

या तोट्याबरोबरच इंटरनेटद्वारे आपल्याला खूप मोठे वरदान लाभले आहे. या इंटरनेटमार्फत आपल्यापुढे खूप मोठा माहितीचा विस्फोट उभा आहे. 

याद्वारे आपल्याला जगातील कोणतीही, कसलीही, कशाहीप्रकारची माहिती मिळवु शकतो. जर आपल्याला ती माहिती कोणत्या संकेतस्थळावर आहे हे शोधण्यासाठी याहू, गुगलसारखे संकेतस्थळे शोधुन देणारे माध्यमेही आहेत. या इंटरनेटचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे 'ई-मेल' ज्याला 'इलेक्ट्रॉनिक मेल' ही म्हणतात. याद्वारे आपण आपल्या मित्राला नातेवाइकाच्या सेकंदाच्या काही भागामध्ये पत्र पाठवू शकतो. यामार्फत आपल्याला बाहेर कोठेही न जाता घरातल्या घरात संगणकाद्वारे कोणतीही वस्तू विकत घेऊ शकतो. यालाच इ. कॉमर्स म्हणतात

.

भविष्यात इंटरनेटची खूप मोठी भरारी होणार आहे. सध्या जे रोबोट आहेत त्याला जर इंटरनेटचे तंत्रज्ञान विकसित केले तर त्याला प्रश्न विचारण्याचा अवकाश, तात्काळ तो तुमच्यासमोर त्याचे उत्तर सादर करेल.

या इंटरनेटमार्फत जे धोके संभवतात त्यासाठी चांगले असे सायबर लॉ योजले पाहिजेत.त्याचबरोबर आपण त्या इंटरनेटचे गुलाम होण्यापेक्षा त्याला आपणच गुलाम ठेवले पाहिजे. इंटरनेट आपला वेळ वाचविण्यासाठी विकसित  कले आहे . त्याला तेथेच मर्यादित ठेवले पाहिजे.


या इंटरनेटच्या महापुराला आपले जीवन सुखकर करण्यासाठी उपयोगात आणावे. तो तुमचा दक्ष सेवक आहे. जे तुम्ही त्याच्याकडून मागाल ते तुम्हांला चांगल्या प्रकारे देऊ शकेल. इंटरनेटचा योग्य वापर करावा.